शलौम शाब - १०

02 February 2012 वेळ: Thursday, February 02, 2012
काठमांडू आणि पाटण मधून बागमती नदी वाहते. पाटण देखील भारतापुरसारखेच एक इतिहासिक मोल असलेली जागा. सकाळची एक पटकन चक्कर मारून परत फिरलो. मामाचे एक मित्र काठमांडूत असतात. त्यांची पण भेट घ्यावी, म्हणून त्यांना फोन केला. सकाळ संध्याकाळचे जेवण त्यांच्या बरोबर घेण्याचा आग्रह केला. संध्याकाळी तारांकित हॉटेल मधे जेवण, तर सकाळी  नाश्त्यासाठी गुरवार असून सुद्धा माझ्या करता ऑम्लेट. त्यांना एकच हळहळ होती, "आधी फोन का नाही केला. आता सगळं बघून झाल्यावर भेटलास आम्हाला." राजभंडारी परिवार सोबत गप्पा आणि जेवणाचे वेग-वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन नेपाळ होऊन परतायचे विचार येऊ लागले.

कुठे तरी दिलेल्या वेळेत पोहचण्यात ती मजा नाही, जी मनात येईल तेंव्हा प्रवास करण्यात आहे. नवीन लोक, स्वभावांची ओळख वाढवत. कदाचीत ही लोक मला पुन्हा कधी भेटणार देखील नाही, पण कुठेतरी ह्यांच्या स्वभावाची/विचारांची नोंद घेतल्या गेली होती. कधी एखाद्या बाबतीत आत्मविश्वास असल्यास, आपण त्याची चिंता करत नाही. ती गोष्ट नेमकी कशी होणार, हे आतून बाहेरून माहिती असतं. तिच्यात ना आपण सौंदर्य बघतो, न तिच्यातल्या खुबी बघून भारावून जातो. म्हणूनच मी इथले रस्ते फिरतांना त्यांच्या प्रेमात पडायचो. हेच ते रस्ते होते, जे मला माझ्या मनात येईल त्या ठिकाणी पोहचवत. त्यांनी मला कधी कमीपण नाही दिला. तुम्ही कधी अश्या माणसाला भेटला आहात का, जो शुक्रवार पेठेचे कौतुक करतोये. स्वारगेट बस स्थानकाचे भव्य रूपाचे वर्णन करतो आहे. एकदा काय सगळं घिसा-पिटा वाटू लागलं की मग नवीन जागेचा शोध घ्यावा. कोण जाणे तिथले माणसं आणि त्यांचे राहणीमान बघून आपल्याला स्वतःमधे काही नवीन बदल घडवण्याची प्रेरणा मिळेल. नुसता प्रवास करून, तिथले पर्यटन स्थळे पाहून फिरून येण्यात काय ठेवलंय? अश्या फिरण्यात जर तुम्ही तिथली गर्दी आणि मुंबईच्या लोकल मधल्या गर्दीची तुलना करत राहिलात, तर तुम्ही किती वेळ फिरलात?


अजून आपण एवोल्युशनच्या एका transit stage मधे आहोत. माणूस स्थायिक झाला हे निश्चित, पण ह्यात त्याची mobility hamper झाली आहे. माणसाने आता फक्त कामा पुरताच फिरावे? स्वतःच्या भौतिक previlages चे गुलाम बनून राहावे? Needs आणि previlages मधे फरक आहे. नेमकं साला रोटी कपडा आणि मकान मधे आय-फोन घुसला आणि आम्ही सगळे चक्रावून गेलो! ह्यातून बाहेर पडायचा रस्ता आपण सर्व आप-आपल्या परीने शोधू पाहतो आहोत. 

आयुष्य म्हणजे नुसतेच गाठीशी चार पैसे जमवणे. आपल्या अडचणीच्या वेळी खर्च करायचे हे नक्कीच नसावे. ह्या पेक्षा मोठा हेतू क्वचितच कुठे दिसतो. शेवटी सगळ्यांचा एकच शोध चालू आहे, आनंद प्राप्तीचा.

उद्या इथून गोरखपूर गाठायचे.
तिथून पुढे कुठे जायचे ते मला ठाऊक नाही.




  

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates