मेंढा लेखा

25 March 2011 वेळ: Friday, March 25, 2011
मेंढा तसं एक भारतातील इतर गावांसारखा गाव, गडचिरोली पासून ३० एक किलोमीटर वर मेंढा आहे. बस अगदी आतपर्यंत येत नाही. कंडक्टरला "लेखा" जवळचा मेंढा मात्र लक्षात ठेऊन सांगा. ते काय आहे, जवळ पास २-३ मेंढा नावाची गावं आहेत.

असो, ह्या गावाबद्द आधीपण ऐकलं होतं. इकडे १९८७ पासून consensus democracy practice केली जातेय. सर्व अडचणींचा इलाज एकत्रित येऊन हे गावकरी करतात.
हे गावकरी म्हणजे गोंड राज्याची प्रजा आहे. मूळ व्यवसाय ह्यांचा शेती आहे. मराठी बोलता येते.

चरणदास आणि सदुभाऊने आमचं स्वागत केलं. इकडे नमस्कार करायची एक वेगळीच पद्धत आहे! आधी हात मिळवण्यासाठी दोन्ही हात पुढे करावे, आणि समोरच्याचे हात धरून (शेक न देता) नमस्कार करतात. दोघांनी मिळून आमची खूब मेहमान नावाझी केली. मग गाव फिरतांना सदु आम्हाला माहिती पुरवत होता. सदूच्या खांद्यावर एक शबनम पिशवी पण होती. त्यात एक वही, आणि काही कागद होते. एका ठिकाणी त्याने बोलता बोलता त्याच्या वहीत कसली तरी नोंदपण केली. गावकरी तसे आप-आपसात गोंडी बोलत. आता माझापण कान गोंडी भाषेला रुळला, थोडीफार मला समजू लागली होती. मिहीरला हि भाषा काही नवीन नव्हती. गावातल्याच एका घरात मग आमची जेवायची पण सोय झाली. जेवतांना सदु सांगत होता, कोणी गृहस्थ आले असतांना त्यांनी आपली सहानुभूती दाखवली. पण त्यांना त्याचा कसलाच खेद नाहीये. उलट शहरातले लोक रोज एकाच ताटात जेवतात, आम्ही रोज नवीन ताटात जेवतो!!

शिक्षणाचं महत्व पटलेली हि लोकं आहेत. ह्यांची मुलं आता आपल्याला काय जमत ह्याचा अनुमान घेऊन आपला धंदा निवडतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात न कोणी आमदार, न कोण खासदार. बरोबरच आहे तसं ह्यांचं. सालं एकदा का आपण त्या "लोचटाला" निवडला, कि आपली देशाप्रती जबाबदारी संपली? जितकं पेराल, तितकाच उगवेल ना? मग तुम्ही एक दिवस काढला, आणि बदल्यात तुम्हाला एक रांगत पुढे जाणारा देश बघायला मिळतो!

गावात एक गोटुल उभारलाय. बऱ्याच बैठकी, कार्यक्रम इकडेच होतात. सुरवातीला गोटुल बांधतांना झालेला किस्सा ऐकून मज्जा आली.
"फोरेष्टवाल्यांना गोटुल बांधणं मान्य नसल्याने त्यांनी नोटिश पाठवली." मग ते गोटुल पाडलं, त्यावर थंड रित्या गावाने निषेध नोंदवत अजून १२ गोटुल उभे केले. पडलेल्या प्रत्येक गोटुलचं उत्तर १२ गोटुल उभारून द्यायचं असा गावकऱ्यांनी ठरवलं. शेवटी एकदाचे फोरेष्टवाल्यांनी हात टेकले. तसं सर्वांमध्ये एकी आहे, आणि विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी एक स्वतंत्र pannel आहे. गांधीवादी विचार असलेल्या ह्या गावाला आजवर ना तिथल्या नक्षलवाद्यांचा त्रास झाला, ना सरकारकडून.


"दिल्ली, मुंबईत आमचीच सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार"

गावात एखादी समस्या असेल, तर तिचं समाधान गावकरी मिळून करतात. अश्यातच गावासाठी एक शाळा उभी केलीये, एक गेस्ट हाउस, रस्त्याच्या कडेचे दिवे, आणि आपण आपल्या गल्लीतला दिवा काम नसेल करत तर पालिकेला २ शिव्या घालून दुर्लक्षच करतो. कधी फावला वेळ असेल तर एखादा खरमरीत पत्रपण लिहतो (हि पत्रं आपला frustration काढायला लिहल्या सारखे असतात!).

मोहल्ला मिटिंग
रोज संध्याकाळी मोहल्ला मिटिंग असते, ग्रामसभेमध्ये मोहल्ला मिटिंगमध्ये ना सुटलेले विषय फोडले जात. गावात आज एक मध गोळा करून, गळून, बाटलीत सील करण्याकरता लागणारी सामग्री आहे. गावातील skilled workers बांबू पासून शोभेच्या वस्तू बनवतात. unskilled workers मात्र उद्बत्तीला लागणाऱ्या काड्या काढतात. देवाजी काकांनी हे चित्र साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज मेंढा लेखा बरोबरच आजूबाजूची पण बरेच गावं पुढे होऊन consensus democracy अंमलात आणत आहेत.

आतापर्यंत गाव फिरवून दाखवणारे सदुभाऊ आणि चरणदास अगदी गाडी मिळेपर्यंत हायवेवर थांबले. मे महिन्यात चरणदासचं लग्नाचं आमंत्रण आहे!

धनोरा बाजार:



आपला,
(मेंढाळलेला) माचाफुको

विदर्भ

24 March 2011 वेळ: Thursday, March 24, 2011
परत एकदा सेकंड क्लास स्लीपर कोचच्या एका साईड बर्थ वर तंगड्या पसरवून खिडकीतून येणारी हवा, दूर मावळता सूर्य बघत प्रवास!
ह्या वेळी बरोबरीला कौस्तुभ आणि आदित्य होते. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन पुढे काय सुचेल तिकडे जायचं ठरवलं होतं. ह्या वेळी खूप confusion झालं होतं. थंडी पण कडाक्याची होती. उत्तर
भारत फिरण्यावर इकडेच फुली मारलेली बरी, दक्षिण भारताचा मूड न्हवता. आता करायचं काय? सरते शेवटी वेळेवर जे सुचेल तिथे जाऊ. (निर्णय घेणं फक्त आपल्यावर आणि आपल्यापुरता असतांना, निर्णय घेणं सोप्पं वाटतं!)
वाटेत बडनेरा वर एक प्रवासी (साधारण आमच्याच वयाचा) आमच्या शेजारी बसला. मग सहज गप्पा सुरु झाल्या, त्याला सांगितलं कि आम्ही विदर्भ बघायला जातोये, एकदम खुश होऊन तो एक एक ठिकाणांचे नावं सांगत होता. तिथपर्यंत ठीक असतं हो. ह्या पुढे उत्साहानी लगेच laptop काढून, त्या वर फोटो दाखवले. किती हा उत्साह. मग त्याने सांगितला कि विदर्भातले रेल्वे स्टेशन जास्ती स्वच्छ आहेत. आम्ही मनात म्हंटला, "कमाल आये." यवतमाळ सारखी लाल माती कुठेच नाही. आम्ही मनात म्हंटला, "कमाल आये." कुठल्या पानपट्टी वर खर्रा चांगला भेटतो हे हि ज्ञान आम्ही घेतलं. संत्रा बर्फी कुठून घ्यावी, सावजी पद्धतीचं मटण कुठे चांगला भेटतं. आमच्या ज्ञानात भर पडो किंवा न-पडो, आपल्याला तर हा man आणि त्याच्या पाहुणचार खूप आवडला! जाता जाता त्याचे आभार मानले.
त्याने विचारलं, "तुम्ही नागपूर मधे राहणार कुठे आहात?"
मी, "इकडे माझं घर आहे!"

चंद्रपूर होऊन ताडोबाला जातांना, वाढत्या प्रदूषणाचा चेहरा बघितला. राखेचे डोंगर, आणि खोदकाम चाललेल्या खाणी. ह्या प्रदुषणा विरुद्ध आवाज उठवल्यास, तुम्ही उन्नती मध्ये अडवणूक करताय हा समाज दिल्या जातो. भकास शहर आहे अगदी. कुठे हि नझर फिरवा, आणि तुम्हाला धूर ओकणारी चिमणी दिसेलच. दाताळला जातांना एका नदीला लाल पाणी आहे. एकूण परिस्थिती बघून एकच निष्कर्ष काढता येतो, इथल्या लोकांची सहनशीलता खूपच जास्ती आहे.(तसं सगळ्याच भारतीय नागरिकांची सहनशीलता कौतुकास्पद आहे!) शुद्ध हवा नाही, शुद्ध पाणी नाही, ना धड रस्ते, ना २४ तास वीज, तरी लोक तडजोड करून घेतायत. आपण सगळेच तसे तडजोड करण्यात पटाईत आहोत. मुंबईकर गर्दीशी तडजोड करतो, पुणेकर बेशिस्त वागणुकीशी तडजोड करतो, कोल्हापूरचा पुरेपूर कोल्हापूर वर तडजोड करतो (हा उगाच मारलेला टोला होता). आपल्याला कितीही कठीण परिस्थितीत टाकलं, तरी आपण तडजोड करून एखादा मार्ग काढतो. ती परिस्थिती बदलण्यासाठी वेळ कुणाकडे? ती जवाबदारी नक्की माझीच कशी नाहीये, हे पक्कं ठाऊक असतं आपल्याला. असो....एकूण आजूबाजूचा माहोल बघून डोकं भडकलं.

ताडोबाला शालिक जोगवे नी आमची सोय करून ठेवली होती. सकाळ संध्याकाळ सफारीवर जायचं अन संध्याकाळी परत आल्यावर शालिक बरोबर गप्पा रंगायच्या.
मग जंगलातल्या गोष्टी, आणि तिथल्या गावातली माणसं हा आमचा विषय असायचा.

तसं ह्या वेळी आमच्या नशिबी वाघ न्हवता. (कदाचित मागच्या वेळी ८ वाघ बघितले, म्हणून कोटा भरला असावा) पण इतर प्राणी चिकार दिसले. तसं पण माझ्या १८-५५ च्या लेन्स वरून काही landscapes घेतले.
वाघ नाही दिसला म्हणून मग असा प्राणी शोधून काढला, जो आम नजरेत नाही. आम्हाला आमचा प्राणी मिळाला. स्पॉट करायला काही वेळ लागत नाही. आता आमच्याकडे news होती!

आम्ही आज "Treeshrew" बघितला!! शालिक आणि इतर माहितीगार लोकांना विनोद समजला, इतर सगळे फसले! आता कोणी विचारूच देत कि ताडोबाला काय बघितलात, आम्ही लगेच उत्तर दिलं असता > "Treeshrew"

(पुण्यात रूम मेट्स वर हा प्रयोग केला, यशस्वी ठरला! तुम्ही बघितला आहे का हो treeshrew?)
कौस्तुभ आणि आदित्य मग पुण्याला गेले. मी पण विचार केला, इकडे आलोच आहोत, तर मग हेमलकसा, भामरागड, आनंदवन, सेवाग्राम बघून परत यावं. काही दिव्सांखाली मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा ह्यांनी लिहलेली एक पुस्तिका वाचली होती - "मेंढा (लेखा) - The village that declared that 'We have our government in Delhi and Mumbai, But in our village we ourselves are the government.'

ठरलं तर मग. मेंढाला जायचं.

गडचिरोलीला जातोये, ऐकून आजी - आबांनी जरा टेन्शन घेतलं. मी म्हणतो, उगाच बदनाम करून ठेवलाय गडचिरोलीला. छोटंसं शहर आहे. इतर विदर्भातल्या शहरा सारखं हे हि एक.







आपला,
(विदर्भीय) माचाफुको

विडंबन

06 March 2011 वेळ: Sunday, March 06, 2011
मेघच्या ब्लॉगवर एकदा एक विडंबन केलेलं. आज उगीच आळवतोय...

मूळ गाणं: भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

अन् हे ते विडंबन:

तिष्ठणे इथले संपत नाही, मी अजूनी बेरोजगार पडूनी आहे,
दिवस रात्र मी केलेली, ऍप्लिकेशन्स तशीच पेंडिंग आहे...
मी करे अर्ज नोकऱ्यांचा, अन ह्यांतच वेळ जातो वाया,
नाहीच कसला प्रतिसाद, जराशीही उमेद जागवाया...
ह्या रिसेशनच्या नाजूक वेळी, नोकऱ्या गमावून बसती,
हाती घेऊन रिझ्यूमे, दारोदारी कंपन्यांच्या फिरती...
हा झोल नियतीचा सगळा, आयुष्य रखडवूनी गेला,
आर्थिक मंदीच्या दुष्काळात जणू, तेरावा महिना आला...
जाऊनी पलिकडे सगळ्याच्या, मी म्हणे स्वतःला जरा थांब,
कोरड पडली घशास माझ्या, मी इतकी मारली बोंब...
बिगारी कामातील मजूरासम, मी झटलो हो नेटाने,
डोक्यात घालती गोंधळ, विचारांचे अगणित भुंगे...
बधिर इंद्रिये अवघी, हरपुन भान जाणिवांचे,
हे सरता संपत नाही, ग्रहण माझ्या दुर्दैवाचे...
हे सगळे अवेळी होते, फास्यांनी चुकविली खेळी,
मेंदुत राहीली माझ्या, विणलेली कोळ्यांची जाळी...


आपला,
(लय बेक्कार) सौरभ

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates