राजेश खन्ना

20 July 2012 वेळ: Friday, July 20, 2012

आयच्या गावात!!! १७/३ नंतर डायरेक्ट ४ महिन्यांनी पोस्ट पडत्ये. आणि ती पण राजेश खन्नाच्या नावाने. भेंडी गवार ललिता पवार...  राजेश खन्ना off झाल्याची न्यूज ऐकुन मझ्या थोबाडावर पण :O ची स्मायली प्रकटली. संबंध काय??? राजेश खन्ना माझ्या generationचा हिरो नाही. मी त्याच्या खुप काही मुव्ही पाहिल्या नाहीत. आनंद पाहिलाय, बावर्ची पाहिलाय... आणि.... जोर देऊन आठवावं लागेल... लेऽऽऽ... पण तरीसुद्धा आठवत नाही. म्हणजे २ मुव्ही सोडल्या तर मी तुला ओळखत नाही.???!!! त्याची स्टाईल.... मला अज्जिबात आवडत नाही. तो "अरे ओ पुस्पा" डायलॉग तर डोक्यात जातो. Honestly दिसायला धर्मेंद्रसारखा रुबाबदारपण नाही. Okkay... तरी राजेश खन्नाचं जाणं माझ्यासाठी एक मोठी न्यूज होती. का??? कदाचित त्याच्या Stardomचं जे मोठं वजन इतरांमुळे तयार झालय ते असावं.

(Dood... chill... come to the point...)

ह्हा... तर न्यूज चॅनलच्या चक्क्यांना दळण्यासाठी किमान दोन दिवस पुरेल एवढं "सकस" धान्यं मिळालय. मुव्ही चॅनलवाल्यांना ये हफ्ता राजेश खन्ना के नाम म्हणुन त्याच्या काही मुव्हीज लूपमधे टाकून आठवड्याभराची सुटी घेता येईल. म्युझिक चॅनलवरपण त्याचीच गाणी (नविन मुव्हीचे म्युझिक प्रोमोज बोंबल्ले). फेसबुक/ट्विटरवर तर राजेश खन्ना नावाची त्सुनामी आली. कित्येकांच्या पोस्टमधेच काय तर प्रोफाईल पिक्चरमधेपण तो घुसला.

(तुजे आवशीचो घोव... तुजा प्रोब्लेम काय असा? Why u complain???)

Nonsense m not complanin. Okay... तर मुद्दा असाय की राजेश खन्नाबद्दल किंवा त्याच्या पहिला बॉलिवुड सुपरस्टार असण्याबद्दल काहिही attachment नसतानासुद्धा एक गोष्ट अशी झाली की ज्याबद्दल मी त्याला प्रचंड मान देतो. गुरु झाला तो माझा.

न्यूज चॅनलवर २४ तास राजेश खन्नाच्या निधनाची बातमी... मला कशाचं काही सोयर-सुतक नाही (हलकट आहे मी)... आणि अचानक एका न्यूज चॅनलवर "आनंद"मधला तो सीन दाखवला.. तो जेव्हा मरतो... अमिताभ बच्चन "मुझसे बात करो" म्हणुन ओरडुन त्याच्या छाताडावर कोसळतो... आणि मागुन एक आवाज येतो... बाबुमोशाय... GOD LIKE scene!!! काय नाहीये त्या सीनमधे? एक माणुस आपल्या आयुष्यातुन कायमचं निघुन गेल्याचं सत्य... ते मान्य करण्याची आपली हतबलता... तरी तो परत येईल ह्या आशेने केलेला आक्रोश... आणि एक क्षण का होईना पण तो परत आला आहे असा आनंद देणारा फसवा भास... कलेजा खल्लास... खून के आसू रोता दिल.

Shoot man!!! साला खराखुरा हाडामांसाचा माणुस मेल्याचं काही वाटत नाही. पण त्याच्या मरणाचा अभिनय तोडफोड करुन जातो! Larger than life. ये होता है काम. जीव लाऊन कि जीव टाकुन केलेलं काम. खर्रा सोना!!!

राजेश खन्नाजी... (जी??? च्यायला आत्तापर्यंत चड्डी-buddy सारखा एकेरी उल्लेख आणि आता जी!!!... हा जी...) You taught me one thing, that moment - how your work should be. I shall try my best and wish I could do it someday. One should always be remembered for his/her work, just like you.

काकाजी... RIP... prayers.. wishes.. and RESPECT to you...


आपला,
(नम्र आणि प्रेरित) सौरभ


ती

17 March 2012 वेळ: Saturday, March 17, 2012

कशी गोरीप्पान काया असलेली ती

मादकतेने  ठासून  भरलेली

हलकेच जवळ घ्यावी

नाजूक देहाची

ओठांचा स्पर्श

आणि मग एक ठिणगी पेटते

झप्पकन ज्वाला उठते

ती पेट घेते

एक दीर्घ  श्वास

नशाऽऽऽऽऽ

गरम शरीर

थंड मेंदू

भरलेली फुफ्फुस

रिकामे विचार

श्वास बाहेर पडतो

तिने पेट घेतलेला असतो

जळत असते ती

उंगलीयोपे नचाता उसको मै

ती नाचते

मला बघायला आवडतं

राक्षसी काहीच वाटत नाही

तिला पण माझी किळस येत नाही

मला आवडते ती... जळताना ...

तिचा पूर्ण देह जळेस्तोवर तिला उपभोगतो मी

ती मला शांत करत असते

तिने घड्याळाचे काटे थांबवलेले असतात

मी अनंतात विलीन झालेलो असतो

तिच्यामुळे मी फक्त मी असतो

जग शून्य झालेल असतं

बोटांना तिच्या पूर्ण होणाऱ्या अस्तित्वाची धग जाणवते

तिने मला आकंठ सुख दिलेलं असतं

ती अगदी निर्मोही

पूर्ण गुंगवून स्वतःला वेगळं ठेवलेलं

सुरेश भटांच्या ओळी तिला चपखल बसतात

रंगूनी रंगात साऱ्या... रंग माझा वेगळा

ती देहात उतरून पण नसतेच

मी तिला विझवतो

वाईट नाही वाटत

तिच्या जाण्याचं दुःख नसतं

तिने घातलेली भूल मी अजून अनुभवतोय

विझताना पण ती तिच्यातली धग दाखवत होती

एक धुराची रेषा  हवेत सरळ गेली... नाहीशी झाली

मी पुन्हा माणसात आलोय...

तिने मला माणूस म्हणून जाणवून घेता येणारे सगळे अनुभव दिले

पण तिच्याशी संगत केलेली पाहून अनेक माणसांनी मला परक केलं...


लीनाशी गप्पा मारता-मारता अचानक तंद्री लागली आणि हलकेच समाधित घुसलो... समाधिवस्थेत पाजळलेलं तत्वज्ञान आज मेलबॉक्समधे टंकून आलेलं. बहुत मजा आया... Thanks Leena...

आपला,
(धुंद) सौरभ

तार

12 March 2012 वेळ: Monday, March 12, 2012

मध्यरात्र - अंधार्या आकाशात मोठा हसरा चंद्र. गाडीचा दिवा बंद!
चेहऱ्यावर भर्रराट्याचा वारा. रस्त्यावरच्या धूळ मातीला आपल्या केसात जागा करून देत.
थंडीने कुडकुडत, एखाद्या गावातल्या शेकोटीची उब घेऊन गाडी रेम्टाव.
समुद्राची ओढ. सूर्योदयाच्या आधीच समुद्राच्या गार वाळूत येऊन पडावं.
लाटांची गाज कानावर पडत राहावी, अन गार वाळूत झोप लागावी. दिवस असाच निघून जावा.
Infinity चा शोध कधी लागेल?

कट्टा-सोंड्या

01 March 2012 वेळ: Thursday, March 01, 2012

सोंड्या हा तसा अभ्यासाचा खूप मोठा विषय होऊ शकतो. त्याच्या स्वभावाच्या प्रत्येक धाग्याला धरून पीएचडी होऊ शकते.
पुढे सरळ रस्ता दिसला म्हणून, गाडी (होंडा Activa - चं विमान) चालवतांना एखादी डुलकी मारणारा शोधून कुठे सापडणार नाही. दुनियेत सोंड्याला कोण किती पीळेल ह्याचं प्रमाण इनफिनिटी मध्ये सांगणे म्हणजे सोंड्याचा अपमान आहे. कट्ट्यावर वर्षानु वर्षे सोंड्या वर नित्य-नेमाने रोज एक तरी गेम पडतो.

सोंड्याचे तसे छंद पण काही कमी नाहीत. कॅरम वर पैज लावणे, फो-रेक्स मध्ये पैसे गुंतवणे. हे सगळं तो पैसा गमावण्यासाठीच करतो जणू. कडकीमध्ये मी पण सोंड्याशी पैज लाऊन माझ्या चहाची बिलं भरली आहे.


हिशोबाचा पक्का, पण इतर सगळ्या गोष्टींमध्ये धांदरट. स्वभावाने थोडे राजे आहेत. झीप्पो त्यांनी अश्या शाही थाटात घेतला खरा, पण त्याचे तुकडे कसे पडले हे तुम्हाला कोणी पण सांगेल. त्याच्या प्रत्येक वाक्यात काही तरी वेगळेपण असतं. तो "Happy New Year" ला "Many happy returns of the New Year" म्हणून शुभेच्छा देईल.


आधी दोस्ती तपासण्यासाठी एकदा विचारून घेतो, माझ्या कडे पैसे नाहीत माझे चहाचे पैसे भरशील का? अन मग आम्हा दोघांच्या चहाचे पैसे तोच भरेल. अजून लहान पोर आहे ते. त्याला कितीही रागवा, शिव्या द्या अन्न ती चूक पुन्हा होऊ नये ह्याचे फंडे द्या. शेवटी महराज पुन्हा तेच करून येतील आणि मग हसतील. ह्यासाठी उदाहरण देणं गरजेचं आहे. आम्हाला एका रविवारी बाईक घेऊन ताम्हिणी घाटात फिरून यायची इच्छा झाली. सगळे मित्र ३-४ बाईक वरून निघालो. पौड रस्त्यावर वाय.डी ची गाडी पंक्चर झाली. तिकडेच एका टायरवाल्याकडून पंक्चर काढून घेतलं. पुढे पुन्हा चांदणी चौकात वाय.डीची गाडी पंक्चर. आम्ही चाक काढून पंक्चर काढून आणायचा विचार केला. पण नेमकं हवे ते पाने त्या टूल-कीट मध्ये न्हवते. मग सोंड्याला सांगितला कि तू तुझ्या गाडी वरून जाऊन पंक्चरवाला घेऊन ये. एक तास झाला अजून पंक्चरवाला नाही म्हंटल्यावर सोंड्याला फोन करून विचारलं काय रे बाबा, तू कुठे अडलास? तर म्हणे आलो ५ मिनटात. ५ मिनटा सांगून हा २० मिनटानंतर आला. सोबत पंक्चरवाला पण वेगळाच होता. मगाशचा न्हवता. त्याला विचारल्यावर म्हणे, टिळक रस्त्यावर माझ्या ओळखीचा एक पंक्चरवाला आहे. त्यालाच घेऊन आलो बघ. आता काही प्रोब्लेम नाही. अशे चालतात आमच्या सोंड्याच्या अकलेचे घोडे. २ कि.मी. वरच्या पंक्चरवाल्याला आणायच्या ऐवजी त्याने डायरेक्ट ८ किलोमीटर वरून त्याचा पंक्चरवाला आणला! आता काय म्हणायचं ह्याला? पंक्चरवाला पण एका अटीवर तयार झाला होता. त्याला न्यायचा आणि आणायची अट होती. ती ताम्हिणी घाटाची ट्रीप सोंड्याकडून चांगलीच वसूल केली.



आमच्या ह्या मित्राला मिळेल ते गाणं मराठी मध्ये अनुवाद करून बेसुर्या आवाजात गायची फार हौस.
"जबसे तेरे नैना, मेरे नैनोसे लागे रे"
ह्याचा अनुवाद, "जेव्हा माझे डोळे, तुझ्या डोळ्यांशी जुळले रे" असा करून आम्ही त्याला गाण्यात साथ द्यावी म्हणून मग "आहा" म्हणत. त्याच्या गाण्याच्या प्रत्येक ओळी नंतर एक समूहदायिक  "आहा" येत.

सोंड्याचे तसे रंग चिकार! लिहावा ते थोडं. त्याने आमच्या विनोदी गोष्टींना पुरवलेलं भांडवल, हे जन्मात कोणाला जमणार नाही असं.
अजून त्याच्या शिक्षणातून गणित नावाचा भूत उतरत नसल्याने, डिग्री अडली आहे. आता मात्र स्वतःच्याच वडलांच्या कामात हातभर लावतो आहे.

कट्टा - तानसेन

26 February 2012 वेळ: Sunday, February 26, 2012

मुंबईत जसे सगळे मित्र नाक्यावर भेटतात, तसं पुण्यात कट्ट्यावर. एकंदर माहोल तुमच्या लक्षात आलाच असेल. इकडे सगळ्यांची एक खास ओळख असते. संध्याकाळची सहा ते दहा ह्या वेळी एखाद्या हॉस्टेलवर राहणाऱ्यासाठी आयुष्यातली अत्यंत भकास वेळ. मग तिला थोडं रंगीन करायला सगळे कुठेतरी एकत्र जमून "ignorance is bliss" मधे वेळ काटून नेणार. दररोज संध्याकाळी प्रत्येकाचा नवीन विषय असतो. कोणाची लफडी, कोणाचा वचपा, कोणाच्या फोका....आमच्या कट्ट्यावर पण असे बहाद्दर असणारच. (आता सगळे मार्गी लागलेत.)

सुरवात तानसेन पासून करावी म्हणतो. आमचा तानसेन हा कट्ट्यावरचा राज-गायक होता. (ह्याचा अर्थ असा नाही की तो सगळ्यांपेक्षा चांगलं गायचा.) कही वर्षांपूर्वी विजय मल्ल्याला competition द्यायला मीच एक आमची कंपनी काढली होती. आमच्या कंपनीचं पण नाव "यु.बी" होतं. फरक इतकाच की इथे यु.बी चा अर्थ "उदास बंधू" असा होत. तानसेन आमच्या कंपनीचा "brand ambassador" होता. त्या मागे कारणही तितकंच तगडं होतं. त्याला नेहमी होलसेल मधे टेंशन असायचं. पैसे, धंदा, गायन, घर हे सगळे टेंशन हह्याला स्वस्तात मिळायचे. इतक्या टेन्शन्स पोसणाऱ्याला मग गाणे पण दुखी सुचायचे.

तसं पाहता तानसेन जिद्दी होता. शहरात आलेल्या प्रत्येक audition मधे हजेरी लावायचा. ३-४ round पार करायचा अन् मग सायेब अडकायचे. अगदी पिंपरी-चिंचवड आयडॉल मधे पण आजकाल वशिलेबाजी चालते. तिकडे तर आमचा दोस्त उपांत्य फेरीत जाऊन आला. पण हा साला कधी खच्ची नाही झाला. त्याच्याकडे एक डायरी असायची, त्यात तो आवडलेले गाणे-कविता लिहून ठेवत. कुठे जरा मोकळी हवा आणि परिसर दिसला की तानसेन रियाज करे. "मैने तेरे लिये ही जग छोडा, तू मुझको छोड चली....." ह्यात बीट सुटला म्हणून काय झालं, ह्याचा सूर मात्र जाम उंच लागायचा. दिल चाहता है - मधलं तन्हाई गाणं तर तो जे रंगवून गायचा, एकदम दिल खुष व्हायचं. पण आमच्या तानसेनचा ज्यूक-बॉक्स थोडा लिमिटेड होता. मग आपलं रोज cassette ची आधी A-side वाजायची, अन् मग B-side.

एकदा आम्ही सगळे निलकंठेश्वरला जायचं ठरवलं. पावसाळी हवा होती, त्यात तानसेन ची यारी. थोडं वर गेलो नाहीतर तानसेनला गाणं गायचा मूड आला. आम्ही सगळे आजू-बाजूच्या दगडांवर टेकलो. तानसेन मात्र उभा राहून perform करत होता. आता एका पाठोपाठ ४ गाणे आले होते. आम्हाला वर पोह्चायची घाई लागली होती, पण रियाजमधे टांग अडवणार कोण? तोच खाली शेतातून एक हाक आली..."ओ, बास करा आता!" तानसेनचा लगेच pack-up झाला. हा खरं तर अपमान होता आमच्या तानसेनचा, पण सध्या तो आमच्या पथ्यी पडला होता.

मग एक दिवस  चर्चा खूप रंगली, आजकाल गाण्यांच्या चालीला महत्व आहे की बोल? त्या वेळी हिमेश रेशमियाचे गाणे मोकाट सुटलेले. सगळ्यांचे म्हणणे पडले, की आजकाल गाण्यांमध्ये बोल नसले, अन् रापचिक चाल असली तरी गाणे चालतील. विषय खूप टोका पर्यंत गेला. तानसेनने २-४ दिवसात लगेच एक स्वतःचं गाणं पेश केलं मग!

"पैसा तेरी जेब में कम है तो क्या हुआ?
लेले मेरी जान तू एक.... वडा-पाव" 

त्याला एकदम बँजो स्टायल संगीत पण वाजवलं आम्ही. गाणं लगेच डोक्यात बसलं. तानसेनही खुष!
सुरवातीला खूप उत्साह दाखवला, पण सालं नंतर सगळं ढेपाळलं. आता तानसेन आपली नौकरी करतो, घरच्यांनी लग्न लावून दिलं. गेल्या वर्षी एक मुलगा पण झाला. अजून देखील तानसेनचा अधून मधून फोन येतो. सगळ्यांची आठवण काढतो. गाण्याची आठवण मात्र दोघांपैकी कोणीच काढत नाही. 

मोकळे "आकाश"

25 February 2012 वेळ: Saturday, February 25, 2012
आज मी इथं उभी आहे .. ह्या बुडणाऱ्या सूर्याच्या संगतीन समुद्राच पाणी असं पायावर अनुभवतं...
आकाशी रंग असा हळू हळू लाल मग गडद होईपर्यंत आपण बसलोय इथं .. किती वेळ .. बरेच तास .. काळ गोठलाय जणू ....
आपणही आज आपल्या आवडीचा नितळ आकाशी रंग घातलाय ...
आपलं नेमक उलट झालय नाही का ?....
गडद ,चमचमणाऱ्या रंगातून उठून आपण असे मनासारखे शांत, हलके रंग लेवून बसलोय ...
मागल्या वर्षापर्यंत असलं काही स्वप्नातही पाहायचही आपली हिम्मत नव्हती ...
काय करत होतो आपण ह्यावेळी...... मागच्या वर्षी ..

मागच्या वर्षी पर्यंत मन आणि शरीर एका जागी ठेवायच्या गोष्टी नव्हत्या ...मन खुंटीवर ठेवून काम करायचो आपण ..धंदा करायचो आपण........ तेव्हा हळुवार ,नाजूक काही अस्तित्वात असतं हेच माहिती नव्हंत.. आपली मावशी इतर माड्यानवरल्या मावशांपेक्षा बरी हा एकमेव सुखाचा धागा होता आपल्यासाठी ..बाकी रोजच्या रोज ओरबाडण सहन करत होतो आपण ...

साला तिथं झोपडपट्टीत कसलं गटारात जन्माला आलो .. बाप टाकून गेला आई खंगून मेली.. मामानं इथं आणून विकल आपल्याला.. सहा का काय ते वर्षाच असताना ...आपल्याला थोडफार वाचता येतं म्हणून मावशीने भडव्याला चार पैसे जास्तच दिले..... आणि मग पुढे ह्या धंद्यात घुसडलो गेलो.. आधी बिचकत,घाबरत मग निर्ढावत गेंड्याच्या कातडीने रोजचा खेळ मांडत राहिलो ... आपल्या नशिबात सगळे गिर्हाईक पण गांडूच आले...चांगला प्रेमळ गिर्हाईक हे असलं काही सीनेमातच होत असावं असं म्हणत,कण्हत दिवस काढत राहिलो ... शरीराच लोढण पोटासाठी ओढत राहिलो ..
आणि आयुष्य पलटी खावून असं आपल्या मर्जीने जगू शकू असं कधीच वाटलं नव्हतं... त्या बाईंनी येवून आपल्याला बाहेर काढलं दलदलीतून.. काहीजणींना तरी ह्यातून बाहेर पडू देत म्हणून मावशीला खूप समजावलं . इतर मावाश्यांसारखी आपली जनीआक्का हटून नाही राहिली .. तिनं पोरींवर सोपवला निर्णय .. हा... पण म्हणाली गेलात तर ह्या वस्तीच्या आसपास पुन्हा येत येणार नाही तुम्हाला .. मग मी मेले समजायचं ..

शे पाचशे जणींतून आंपण आणि सरू ,दोघीच बाहेर पडलो बाईंसोबत... आणि शिकत सावरत आता इथे येवून मानान चार पैशे कमावतोय ....
किती वेळ झाला बसलोय नाही .. किती गर्दी कोणी कोणाला ओळखत नाही कोणी कोणाला टोकत नाही ..
अरे हा तोच पोरगा का ... पाहिलं त्यांनपण मला...... ओळखलं वाटत ..
"पूनम इथे कशी ..." त्यानं सवाल टाकलाच
"........................."
"ओळखल नाहीस मला पुण्यात यायचो मित्रांबरोबर तुमच्या इलाक्यात गप्पा मारायला" तो
"अरे तो होय तू .. तरीच म्हणत होते तुला कुठतरी पाहिलंय म्हणून ..." उगाच खोट
"तू एकटीच जिनं नाव सांगितलं होत आम्हाला म्हणून लक्षात राहिलीस बघ , पण इकडे एवढ्या लांब कशी.. आणि किती वेगळी दिसतेयस तू ...." त्याच्या चेहर्यावरच आश्चर्य मला स्पष्ट दिसतंय, कळतंय
"धंदा सुटला माझा ..आता एका स्टोरमध्ये काम करते मी ...." आणि मग त्याला सगळी हकीकत सांगितली... चेहरा उजळत गेला त्याचा ...
एकदम तसाच आहे हा आधीसारखा ..
"काय सांगतेस काय ..मस्तच ग .. खर सांगू पहिल्यांदा तुला आज असं एवढ खुश पाहतोय मी ..."

किती मनापासून बोलतोय हा .. तेव्हाही असाच बोलायचा नाही का .. आणि आपल्याविषयी वाटणारी काळजी,दुखः ह्याच्या चेहऱ्यावर उमटायचं .. आपल्याला ह्याच्या गोर्या, बोलक्या चेहऱ्याच, पाणीदार डोळ्याचं कौतुक वाटायचं .. खूप काही बोलायचं आहे पण हा थोपवून धरतोय असं वाटायचं .. पुरुषाशी गप्पा हा चैनीचा विषय होता आणि मावशी बारीक डोळा करून पाहत रहायची म्हणून काहीच करू शकायचो नाही .. ह्याच अस्वस्थपणं जाणवतं राहायचं ....
आणि आता मनापासून हसत उभा आहे आपल्यासमोर ..जसं काही मोठ गवसलय ह्याला ... आणि अचानक हनुवटी पकडून चेहरा हलवलाय आपला ... किती निरागस,प्रेमळ स्पर्श हा ... एवढ्या वर्षातून पहिल्यांदा अनुभवत आहोत असा स्पर्श ...

तेव्हाही वाटायचं नाही का आपल्याला कोणीतरी हलकेच आपली पाठ थोपटावी, हात पकडून धीर द्यावा .. आणि तेव्हाही ह्याचाच चेहेरा यायचा डोळ्यासमोर .. आपल्यासारख्या बाईकडूनही 'तसली' अपेक्षा न करणारा .. डोळ्यातून धीर देणारा ..
आणि आता अनपेक्षितपणे उभा आहे आपल्यासमोर आपल्या सुखाच्या क्षणी आपण वर्षानुवर्ष वाट पाहिलेला.. स्पर्श देत ...

तेव्हा वाटायचं ह्यालाही आपल्याला असा धीर द्यायचा आहे ... पण त्याला कसलीशी भीती वाटत असावी ..मी काय विचार करेन ह्याचा कदाचित .. मला हे उमजूनही सांगता नाही आल तेव्हा तुला कि, माणसा एवढी वर्ष असले किळसवाणे,ओंगळवाणे स्पर्श अनुभवते आहे मी .. तुझ्या स्पर्शाचा चुकीचा अर्थ मी स्वप्नातही काढू शकले नसते .. पण तू इतका निरागस की मला स्पर्शाचं वाईट वाटू नये म्हणून दूर राहिलास ..मला धीर देता नाही येत म्हंणून स्वतःशी झुंजत राहिलास ...मला तुझी तगमग कळली नाही अस नाही पण माझ्या हातात काहीही नव्हत

आणि इथे तू असा मला धीर देतो आहेस ....

अचानक तुझा चेहरा बदललाय... कसलच अपराधीपण उमटलय तुझ्या ह्या बोलक्या चेहऱ्यावर... मला स्पर्श केलेल्या हाताकडे तू विचित्रपणे पाहत आहेस ..
मी न राहवून विच्रातेय.. "काय झाल रे ........"
तू उत्तर देवू नको देवूच्या द्विधा मनस्तिथीत .." काही नाही "
" बोल रे आज तरी बोल " मी पटकन बोलून गेलेय आणि तू चमकून वर पाहिलयस ..मला तू दडपलेले अनेक शब्द दिसत आहेत हे जाणवून तू चमकला आहेस ...
"खूप बोलावं वाटायचं तेव्हा ...पण नाही जमल .. आणि आज इथे तूला असं हात लावताना अपराधी वाटतंय .. मी भेदभाव केला असं वाटतंय...."
"तसाच हळवा आहेस तू अजून.. तेव्हा नाहीस केलास स्पर्श हे बरचं केलसं तू .. "
"................"
"असला जिव्हाळ्याचा स्पर्श तेव्हा केला असतास तर फक्त अजून दुखं झाल असतं ..कारण काही गोष्टी अनुभवल्या नसल्या की त्या मिळाल्या नाहीत तर आपण कशाला मुकलो आहोत हे माहित नसतं ... कोणीतरी धीराचा स्पर्श करावा असं नेहमी वाटायचं पण त्यात एवढी जादू आहे हे माहित नव्हंतं... आता जाणवतंय तू दूर राहिलास हे चांगलच केलस ... नाहीतर ती नरक यातना अजूनच असह्य झाली असती..

आता तुझा स्पर्श मला धीर देतोय पण दुखः नाही.... वाईट वाटून घेवू नकोस ... शरीरापेक्षा मनाचे हाल किती वाईट हे माझ्यापेक्षा अजून कोण चांगल सांगू शकेल ... मनाला नसत्या शिक्षा देवू नकोस .. तूला माहित नाही तू किती धीर देवू शकतोस,आणि मला भेटलास माझ्या दोन्ही आयुष्यात हे खरच सुखकारी आहे ..हा क्षण दिलास मला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद ..पण आता जाते.. तू मला दिलेला हा आनंदाचा क्षण तू काहीतरी बोलून हिरावून घेशील की काय ह्याची भीती वाटतेय ..म्हणून मी जाते.. काळजी घे ..."

त्याच्या त्या निरागस,पाणी भरल्या डोळ्याकडे पाहत मी निघालेय ... काळोखी वाळू तुडवत ....एक सोनेरी क्षण घेवून .. जगण्यासाठी..................... मी निघालेय .......

- मातुमैनी.

मच्छी बाजार

12 February 2012 वेळ: Sunday, February 12, 2012



एक संध्याकाळ. वर्सोवा कोळीवाड्याच्या कडेला नुकत्याच बोटीतून ताजे मासे भरून आलेत.

फोटो निकालने आए थे, हलवा लेकर जा रहे हैं|




 
 

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates